१४ सप्टेंबर २०१३
अचानक संध्याकाळी एक धक्का बसला . एक जबाबदारी अंगावर पडली ! हे सगळा इतकं अनपेक्षित होतं की तेव्हा कसलाच विचार केला नव्हता . डोक्यात विचारचक्रे सुरु झाली होती पण ; पुढे काय होणार आहे हे तेव्हा कळणार तरी कसे होते ! त्या वेळी आधीच इतक्या गोष्टीत मी गुंतलेले होते की एक चेंलेंज स्वीकारावं तसा काहीसं डोक्यात नोंदले गेले ते क्षण !
१४ सप्टेंबर २०१४
खरंतर ज्या क्षणी मी हे उतरवत आहे त्याच सुमारास हे घडलं . आज बरोबर एक वर्ष पूर्ण झालंय .
सुरुवातीला वाटणारी नसती कटकट नंतर खरंच आनंद देऊन गेली . कधी चेंलेंज म्हणून तर कधी मजा म्हणून जे जे जमेल ते करत गेले .
सगळ्यांपेक्षा वयाने आणि अनुभवाने लहान असूनसुद्धा माझ्यावर कोणीतरी विश्वास टाकला होता माझ्यापरीने मी तो सार्थ ठरवलाय. भल्यासाठी जितकं जमेल तितकं केलंय . चुका माफ नक्कीच होतील
अनेकांना सोबत घेऊन काहीतरी यशस्वी करणं हे सोपं नसतं विशेषत : मुलींना , ह्याची जाणीव ह्या प्रवासात झाली .
अनेक हात सोबतीला पण तोंडं चार दिशांना अश्या परिस्थितीत खंबीरपणे मार्ग कसा काढायचा हेही ह्यानिमित्ताने उमगलं. प्रवाहाविरुद्ध पोहताना अनेक अडचणी असल्या तरीही त्यात एक वेगळी मजाही असते हे समजलंय .
कधी चुकले , कुठे अडखळले. कधी एकटीनेच मार्ग काढला तर कधी कोणाच्या सोबतीने . मार्गदर्शन करायला अनेकांची साथ अन् भरभक्कम पाठींबा वेळोवेळी होताच . त्याशिवाय हे निभावणं शक्यही झालं नसतं .
एका जबाबदारीतून मुक्त झाले . दिवस - रात्र एक करून , जेवण विसरून करावे लागणारे कामही नसेल . उरल्यात त्या फक्त गेल्या वर्षभरातल्या कडू - गोड आठवणी . निरोपाचे दु:ख निश्चितच नाही . पण जोडला गेलेला मित्रपरिवार दुरावेल ह्याचे वाईट नक्कीच वाटतंय .
अशी हि अनुभवांची शिदोरी घेऊन आता पुढे वाटचाल करणार आहे .
अगदी मुक्तपणे .. . .
- संपदा
अचानक संध्याकाळी एक धक्का बसला . एक जबाबदारी अंगावर पडली ! हे सगळा इतकं अनपेक्षित होतं की तेव्हा कसलाच विचार केला नव्हता . डोक्यात विचारचक्रे सुरु झाली होती पण ; पुढे काय होणार आहे हे तेव्हा कळणार तरी कसे होते ! त्या वेळी आधीच इतक्या गोष्टीत मी गुंतलेले होते की एक चेंलेंज स्वीकारावं तसा काहीसं डोक्यात नोंदले गेले ते क्षण !
१४ सप्टेंबर २०१४
खरंतर ज्या क्षणी मी हे उतरवत आहे त्याच सुमारास हे घडलं . आज बरोबर एक वर्ष पूर्ण झालंय .
सुरुवातीला वाटणारी नसती कटकट नंतर खरंच आनंद देऊन गेली . कधी चेंलेंज म्हणून तर कधी मजा म्हणून जे जे जमेल ते करत गेले .
सगळ्यांपेक्षा वयाने आणि अनुभवाने लहान असूनसुद्धा माझ्यावर कोणीतरी विश्वास टाकला होता माझ्यापरीने मी तो सार्थ ठरवलाय. भल्यासाठी जितकं जमेल तितकं केलंय . चुका माफ नक्कीच होतील
अनेकांना सोबत घेऊन काहीतरी यशस्वी करणं हे सोपं नसतं विशेषत : मुलींना , ह्याची जाणीव ह्या प्रवासात झाली .
अनेक हात सोबतीला पण तोंडं चार दिशांना अश्या परिस्थितीत खंबीरपणे मार्ग कसा काढायचा हेही ह्यानिमित्ताने उमगलं. प्रवाहाविरुद्ध पोहताना अनेक अडचणी असल्या तरीही त्यात एक वेगळी मजाही असते हे समजलंय .
कधी चुकले , कुठे अडखळले. कधी एकटीनेच मार्ग काढला तर कधी कोणाच्या सोबतीने . मार्गदर्शन करायला अनेकांची साथ अन् भरभक्कम पाठींबा वेळोवेळी होताच . त्याशिवाय हे निभावणं शक्यही झालं नसतं .
एका जबाबदारीतून मुक्त झाले . दिवस - रात्र एक करून , जेवण विसरून करावे लागणारे कामही नसेल . उरल्यात त्या फक्त गेल्या वर्षभरातल्या कडू - गोड आठवणी . निरोपाचे दु:ख निश्चितच नाही . पण जोडला गेलेला मित्रपरिवार दुरावेल ह्याचे वाईट नक्कीच वाटतंय .
अशी हि अनुभवांची शिदोरी घेऊन आता पुढे वाटचाल करणार आहे .
अगदी मुक्तपणे .. . .
- संपदा
मूर्ती लहान पण किर्ती महान ह्याचा साक्षात अनुभव....;-)
उत्तर द्याहटवाकुठेतरी वाचल होत "The more personal you write, the more general and appealing it is".
:-)
अगदी समजू शकतेय तुझ्या भावना. फार काही इथे लिहीत नाही. पण फक्त पोस्ट चे नाव पूर्णविराम नसायला पाहिजे (असं मला वाटतं)- ही तर जगाला जोखण्याची सुरुवात आहे... पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
उत्तर द्याहटवा