रविवार, २० एप्रिल, २०१४

माझा (?) मतदारसंघ !

मी बंगलोरमध्ये असताना १८ वर्षांची झाले अन इथे लगेचच विधानसभेची निवडणूक होती त्यामुळे सध्याचा माझा मतदारसंघ आहे "मल्लेश्वरम - बेंगळूरू उत्तर " पण तरीही माझा खरा मतदारसंघ -  जुना दक्षिण मध्य मुंबई म्हणजेच २००९ च्या फेररचनेनंतरचा नवीन दक्षिण मुंबई शहर हा मतदारसंघ !

येत्या २४ तारखेला येथे  मतदान होणार आहे . हा मतदारसंघ (जेंव्हा दक्षिण मध्य मुंबई होता तेव्हा ) गिरणगावाचा समावेश असल्यामुळे आणि मनसे तेव्हा स्थापन झालेली नसल्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असे . मोहन रावले ह्यांचा हा परंपरागत मतदारसंघ होता परंतु २००९ साली झालेली पुनर्रचना आणि मनसेने बाळा नांदगावकर ह्यांना दिलेली उमेदवारी ह्यांमुळे मतविभागणी होऊन मिलिंद देवरा ह्यांचा विजय सुकर झाला . मिलिंद देवरा ह्यांच्यासाठी ही  निवडणूक चुरशीची होती परंतु मतविभागणीमुळे विजय अक्षरश: सोपा झाला होता . इतर मतदारसंघांप्रमाणेच इथेही मनसे + शिवसेना > कॉंग्रेस हेच चित्र होतं . यंदाच्य आप पक्षाच्य उमेदवार मीरा सन्याल ह्या स्वतंत्र उमेदवार म्हणून उभ्या होत्या अन त्यानाही १० हजाराच्या आसपास मते मिळाली होती .

यंदाची परिस्थिती पाहता अन मीरा सन्याल ह्यांना गेल्या वेळी मिळालेली मते पाहता निवडणूक तिरंगी न होता चौरंगी होईल असा अंदाज आहे . मनसे - शिवसेना हि विभागणी अपरिहार्य आहे . त्यातच मोहन रावले ह्यांनी निवडणुकीच्या ऐन तोंडावर chameleon प्रमाणे शिवसेना - राष्ट्रवादी - शिवसेना असे पक्षाबद्दल केवळ काही आठवड्यांच्या कालावधीत केल्याने त्य्नाच्या समर्थकांमध्ये गोंधळ उडालेला असणे स्वाभाविकच आहे .
अरविंद सावंत - बाळा नांदगावकर  ।।  मिलिंद देवरा - मीरा सन्याल
अशी मतविभागणी होण्याची शक्यता खूपच जास्त आहे .
ह्या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो . ह्याकडे जरा अधिक पाहूया

१ . वरळी : 
विद्यमान आमदार : सचिन अहिर
पक्ष : राष्ट्रवादी कॉंग्रेस
ह्या मतदारसंघावर  ( अर्थातच हा माझा विधानसभा मतदारसंघ आहे ! ) दत्ताजी नलावडे ह्यांची अनेक वर्षे पकड होती . वरळी कोळीवाडा हा शिवसेनेला  कायम मदतीचा हात देणारा विभाग ह्याशिवाय वरळी नाका अन् त्यापलीकडील पूर्वेकडच्या भागातही सेना - मनसेचे प्राबल्य . परंतु नलावडे ह्यांनी घेतलेली निवृत्ती , अहिरांची प्रचंड आर्थिक क्षमता , राजकीय दादागिरी अन पवारांशी जवळीक ह्यामुळे येथे प्रचंड धुमश्चक्री प्रचारादरम्यान पाहायला मिळाली होती . ह्याशिवाय सेना - मनसे मतफ़ुटी होतीच !  येथील मते ह्या  पक्षांत विभागली जातील असा माझा अंदाज आहे . येथील
नगरसेवकांचा जनसंपर्क अफाट आहे अन् त्यामुळेच येथे त्यांचा प्रभाव अन प्रचाराची तीव्रता निर्णायक ठरेल .

२. शिवडी :
विद्यमान आमदार :बाळा नांदगावकर
पक्ष : मनसे
गेल्या वेळी येथे तेव्हाचे आमदार दगडू सकपाळ  ह्यांना  बाळा नांदगावकर ह्यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत पराभूत केले होते . ह्यात प्रामुख्याने गिरणगावात सेना - राज ह्यांच्या झालेली मतविभागणी आणि दोन्ही उमेदवारांचा जनसंपर्क ह्या कारणांचा समावेश होता . यंदा ह्या मतविभागणीला अन् राज ह्यांच्या दिशाहीन प्रचाराला कंटाळल्याने अन मोदींच्या प्रभावामुळे महायुतीकडे मतदार  शकतो परंतु खुद्द नांदगावकरांना मिळालेले तिकीट ह्यामुळे समीकरणे पार बदलू शकतात ,


३. भायखळा 
विद्यमान आमदार :मधुकर चव्हाण
पक्ष :  कॉंग्रेस
ह्या भागात बहुदा भेंडीबाजार , भायखळा आणि इतर पूर्वकडील भागांचा समावेश होत असावा ( मला माहिती मिळाली नाही भौगोलिक दृष्ट्या माझा अंदाज बरोबर असावा ) त्यामुळेच सारी अमराठी मते देवरांना मिळण्याची शक्यता खूपच जास्त आहे .


४. मलबार हिल 
विद्यमान आमदार :मंगलप्रभात लोढा
पक्ष :भाजप
तब्बल वीस वर्षे येथे विद्यमान आमदार निवडून येत आहेत. बाबुलनाथ परिसर तसेच इतर गुजराती बहुल वस्ती , जयवंतीबेन मेहता ह्यांनी तसेच लोढांनी केलेली कामे जनसंपर्क ह्यामुळे हा भाग भाजपची हमखास विजय मिळवून देणारी जाग. त्यातच मोदिलातेमुळे सगळा गुजराती मतदार महायुतीला मत देणार हे जवळपास निश्चित ! ह्याशिवायाही येथे  आहे त्यामुळेच मनसेमुळे मतविभागणी झाली नाही तर अरविंद सावंत ह्यांना येथून चांगलीच आघाडी मिळू शकते .

५. मुंबादेवी 
विद्यमान आमदार :अमीन पटेल
पक्ष :  कॉंग्रेस
येथे देखील मलबार हिल्प्रमाणे  मतदार आणि मूळचे स्थानिक मुंबईकर ( पाठारे - प्रभू ) ( ह्यांची इथे बरीच property आहे असे ऐकिवात आहे ! ) राज पुरोहित ह्यांचा जनसंपर्क ह्यामुळे भाजपचे प्राबल्य आहे परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी मनसे - शिवसेना मतविभागणीचा महायुतीला चांगलाच फटका बसला होत. यंदा ही मते पुन:च महायुतीकडे एकवटली जाऊ शकतात ( सारे काही मोदी effect वर अवलंबून )


६. कुलाबा 
विद्यमान आमदार :शेखर Annie
पक्ष : कॉंग्रेस 
ह्या मतदारसंघात कुलाबा कोळीवाडा अन नेव्हीनगर हे भाग सोडले तर बहुतांश विभाग हा गर्भश्रीमंतांच्या रहिवासाचा आहे . अन हा भाग पूर्वीपासूनच मुरली देवरांच्या परंपरागत मतदारसंघात येत असल्याने कॉंग्रेसची हक्काची मते येथे आहेत .


ह्यासगळ्यात आता 'आप' चा विचार करूया ! मीरा सन्याल ह्यांचे नाय ह्याआधीही मतदारांनी मतदानयंत्रावर पाहिले आहे . आपचा प्रभाव तसा उच्च मध्यमवर्गीय अन् श्रीमंत मतदारांवरच राहील असा अंदाज आहे ह्याचे मुख्य कारण म्हणजेच गिरणगावातील सारी मंडळी बाळासाहेबांना दैवत मानणारी आहेत . जरीही मनसेला मते दिली तरीही त्यांची सेना ( मग ती शिवसेना असो व म. नवनिर्माण !) निष्ठा ढळत नाही !
सन्याल ह्या कॉंग्रेसची मते खेचू शकतात . त्याबाबतीत देवरांना गाफील राहून चालणार नाही . वरळी सी फेस , परळ मधील उच्चभ्रू वस्ती ( ज्याला status symbol वाटावा म्हणून अप्पर वरळी म्हटले जाते जे खरे वरळी नव्हेच ! ) मलबार हिल खंबाला हिल येथील अगुजराथि मतदार , कुलाबा अन मरीन drive परिसर येथे ही आप -  कॉंग्रेस मतविभागणी देवरांना तापदायक ठरू शकते . इतर मराठी बहुल सेनानिष्ठ भागात आप केवळ तरुण मतेच मिळवू शकेल असे सकृतदर्शनी वाटत आहे .

त्यामुळेच येथे चुरशीची चौरंगी लढत पाहायला मिळणार हे निश्चित !
विजय कोणाचा होईल हे सांगणे कठीण असले तर जर आपचा ताप झाला नाही तर देवरांना कोणी हरवू शकेल असे वाटत नाही परंतु कोणत्या विभागात किती टक्के मतदान होईल अन ते कोणत्या वयोगटाचे अन धर्माचे ह्यावर सारी समीकरणे अवलंबून असतील !

पाहूया काय होते आहे ते !

I voted. Will you ?
"Use your right...Cast your vote to bring change" 
Let us build our nation.


- sam

सोमवार, ७ एप्रिल, २०१४

रणसंग्राम

आज ७ एप्रिल २०१४.जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीच्या आयुष्यातील एक महत्वाचा दिवस ! ह्याच दिवशी  म्हणजे आजच १६व्या लोकसभेसाठीच्या मतदानाची देशाच्या एक कोपऱ्यात असलेल्या मतदारसंघापासून सुरुवात झालीये . अनेक अर्थांनी ही निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण  आहे ! त्याचा  थोडक्यात आढावा.

नवीन पिढी : तरुण मतदार

ह्या वर्षी माझ्या पिढीतले म्हणजेच  शतकाच्या शेवटच्या दशकात ज्यांचा जन्म झाला असे सगळे आम्ही लोकसभेसाठी प्रथमच करणार आहोत .
२०१३ साली जर वय १८ वर्षे असेल तर जन्म २०१४ - १८ = १९९५  त्याधीचा हवा .  निवडणूक गेली काही वर्षे दर पाच वर्षांनी होत असल्यामुळे १९९० - ९५ मध्ये जन्मलेल्या सगळ्याच नवमातदारांची पहिली मोठी निवडणूक !

आम्ही इंदिरा - राजीव हा कालखंड केवळ इतिहास - नागरिकशास्त्रात / वृत्तपत्रात वाचलाय . जेव्हा आम्हाला समजू लागलं होतं तेव्हा अटलजींच्या सरकारचे शेवटचे काही महिने राहिले होते . अन मग त्यांनतर UPA ची राजवट !
 सुरुवातीची काही वर्षे सुरळीत गेल्यानंतर अमेरिका - भारत संबंधांमुळे रशियासोबतचे आपले जुने नाते ताणले गेले होते तो एक विचित्र कालावधी होता . त्याच वेळी १२३ मुळे  सरकार अस्थिर झाले होते . अनेक छोट्या पक्षांचा बाहेरून आणि ( बाहेरून नाही म्हणजेच आतून असा माझा समज अन त्याला आर्थिक जोड असावी असा माझा दात संशय ! ) आतून दिलेला पाठींबा . चिदम्बरम ह्यांच्या १९९० सालाप्रमाणे राबवलेल्या आर्थिक सुधारणा ह्यामुळे जरी जनता ह्या सरकारच्या विर्रोधात असली तरीही पुन्हा २००९ साली ( कदाचित शीर सरकार असावे ह्यामुळे असेल अथवा घराणेशाही अन 'गांधी' हे नाव ह्यामुळे असेल ) UPA ला बहुमत मिळून सरकार स्थापन झाले .

 परंतु गेल्या ५ वर्षात जे काही झाले आहे त्याबाबत हि नवीन पिढी twitter, facebook ह्या सगळ्या माध्यमांद्वारे आपली मते परखडपणे मांडताना दिसलीह्या पिढीला अनेकांनी ऐकवला कि तुम्ही मोठ्या संख्येने मतदान केले पाहिजे त्यामुळेच यंदा हा वर्ग मत देईल अन कडची जुन्या गृहितकांना धक्का पोहोचेल अशी काही जाणकारांची अटकळ आहे!
ह्या पिढीचेही प्रामुख्याने दोन गट  पडतात

अ. शहरी तरुण : ( here its assumed that this literacy and basic education are subsets of this category ! )
हाच तो गट जो सार्वजनिक संपर्क माध्यमात मोठ्या संख्येने टीका टिप्पण्या करतो . काहीसा संभ्रमित असा हा मतदार. नक्की कोणाला पाठींबा द्यावा ह्याचा निर्णय नेमका कसा घ्यावा ह्याचा उलगडा ह्यांना अजून झालेला नाही . स्थिर सरकारची गरज कळते आहे पण राजकारणी आश्वासने कधीच पूर्ण करत नाहीत अन् सगळे एकाच माळेचे मणी मग करावे काय हा यक्षप्रश्न आहे !

ब . ग्रामीण तरुण :  शेतीत भविष्य नाही अन् शिक्षणासाठी पैसा नाही ह्या कात्रीत सापडलेला हा गट ( ह्यांच्या मानसिकतेची मला विशेष माहिती नाहीये ! )
   
नवीन पक्ष : आप

राजकारण्यांच्या खोटारड्या वृत्तीला , भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या अन म्हणूनच सरकार विरोधात असलेल्या असंतोषाला अण्णा हजारेंच्या आंदोलनाने मोकळी वात करून दिली . अनेक जन भारावून गेले अंड त्यांनी त्या चळवळीला पाठींबा दिला . त्यातले काही मनापासून चळवळीत सामील होते अन त्यांना ह्या लढ्याची कल्पना होती त्यांचा ह्या  होत तर काही केवळ एक  अन वेगळं काही (  thirll ) म्हणून सामील झाले होते . ह्यातूनच अरविंद केजरीवाल ह्यांच्या डोक्यात एक सुपीक कल्पना उदयाला आली अन आम  पार्टी ह्या पक्षाची स्थापना झाली . केवळ anti - incumbency, नव्याची नवलाई   अन् अण्णांच्या आंदोलनातून निर्माण झालेली  जागरुकता ह्यामुळेच ह्या पक्षाला दिल्लीत अभूतपूर्व यश मिळाले .
यशाची हवा डोक्यात गेल्याने असेल वा अतिअत्मविश्वास , ह्या पक्षाने हि निवडणूक लढवायचे  ठरवले .प्रसारमाध्यमांनी सुरुवातील डोक्यावर घेतल्याने आम्ही म्हणू ती पूर्व दिशा असं काहीसं अरविंद केजारीवालांना वाटू लागलं अन प्रचारसभांमध्ये त्यांचं ताळतंत्र सुटलं .
अनेकांच्या मनातून हा पक्ष सध्या उतरलेला आहे .
केवळ प्रसिद्धीचा हव्यास असलेला एक गात अशी काहीशी प्रतिमा निवडणूक सुरु होतानाचा ह्यांच्याबद्दल  निर्माण होत आहे . अन हे ह्या पक्षासाठी नक्कीच घातक असेल .

व्यक्तिकेंद्री भाजप

ह्या पक्षाबद्दल नेमकं काही सांगता येईल असा नाही पण पूर्वीच्या निवडणुकांमध्ये 'लोकशाही पद्धत ' असलेला पक्ष अशी जी ओळख होती ती आता धुसर होऊ लागली आहे . ' केवळ आणि केवळ मोदी ' असेच काहीसे वेगळेच चित्र यंदा आहे . अरुण जेटली प्रथमच निवडणूक लढवत आहेत . ह्या पक्षाच्या एखाद्या नेतुअने ह्याआधी कधी दोन जागा लाधावाल्याचे माझ्या ऐकिवात नाहीये परंतु विरोधी बाकांवर बसून कंटाळलेले नेते , मोदी लाटेचा फायदा न उठवतील तरच आश्चर्य ! बाकी  ह्यांच्याबद्दल लिहावे तेवढे थोडेच !

राहुल बाळ अन कॉंग्रेस

ह्यांना गेल्या पाच वर्षातला सावळा गोंधळ विसरायला नक्कीच आवडेल म्हणूनच घराणेशाहीवर अन पूर्व पुण्याईवर प्रचार चालू आहे असेच वाटते . राहुल ह्यांची  घेतल्यावर असलेली हि पहिलीच मोठी निवडणूक . नुकत्याच झालेल्या विधानसभेत भाजपने चारलेली धूळ , आप चा उदय अन् दिशाहीनता ह्यामुळेच सगळ्याच पातळ्यांवर वैचारिक गोंधळ उडालेला हा पक्ष नीती यशस्वी होतो ह्यावर कदाचित ह्यांचे भविष्य अवलंबून असेल !

इतर काही बाही

लोकसभा निवडणुकीत लहान पक्षांचे काम मोठ्या पक्षांना हानी पोहोचवण्याचे असते . त्यात के किती यशस्वी होतात हे कळेलच .
सीमाभागात तसेच नक्षलग्रस्त भागांत हि निवडणूक सुरळीत पार पडणे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच मतदानाचा टक्काही यंदा वाढायला हवा आहे . निवडणूक आयोग प्रचंड मेहेनत घेऊन हे काम चोखपणे पार पाडत असतो त्यामुळेच आचारसंहितेचा भंग होणार नाही ह्याची आपण साऱ्यांनीच काळजी घ्यायला हवी .


मतदानाचा हक्क बजावून आपण ह्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी खारीचा वाटा उचलुया .

- sam

PS: अजून  बऱ्याच गोष्टी आहेत पण ते लिहिण्यासाठी वेळ नाहीये त्यामुळे पुन्हा कधीतरी :)