मंगळवार, २२ डिसेंबर, २०१५

आधुनिक भारतीय गणित देवता

१९५८ चा तो काळ ! दुसऱ्या महायुद्धाच्या जखमा घेऊनच जपान इतर क्षेत्रांप्रमाणेच विज्ञानातही पुन्हा भरारी घेण्याचा प्रयत्न करत होता. अमेरिकेनेही त्या काळात जपानमध्ये काही पुनर्वसन उपक्रम राबवले होते. त्याचाच एक भाग म्हणून प्रा. अन्द्रे वेइल सारखे काही विख्यात अमेरिकन गणितज्ञ जपानच्या दौऱ्यावर गेले होते. ह्या दौऱ्यात काही तरुण हुशार जपानी गणिताच्या विद्यार्थ्यांना ह्या गानिताज्ञांसोबत चर्चा करायची संधी मिळाली.मुलाचं गणितातलं ज्ञान पाहून आंद्रेईनी त्यातल्या १०-१५ मुलांना सोबत अमेरिकेत येण्याचं आमंत्रण दिलं. आणि अश्या प्रकारे जपानी अमेरिकन गणितज्ञांची पहिली पिढी अमेरिकेत स्थिरावली.
प्रा. केन ओनो हे दुसऱ्या पिढीतले जपानी- अमेरिकन गणितज्ञ म्हणजेच प्रा. ताकाशी ओनो ह्या गणितज्ञांचे चिरंजीव.
तो काळही अमेरिकेतल्या जपानी मंडळींसाठी विशेषत: केनसारख्या तरुणांसाठी संघर्षाचा होता. पर्ल हार्बर अनेक अमेरिकन्स विसरलेले नव्हते. घरात जपानी शिस्तीचे कडक वातावरण आणि बाहेरच्या अमेरिकन संस्कृतीचे आकर्षण. केनने १६व्या वर्षी शिक्षण सोडून देऊन वडिलांविरोधात बंड पुकारले. त्याच सुमारास एक केनसाठी एक अनपेक्षित घटना घडली. एका सकाळी एस. जानकी अम्मल ह्या बाईंचे पत्र ताकाशी ओनोंसाठी आले. ते पत्र पाहताच प्रा. ताकाशींनी मनोभावे नमस्कार केला अन् अत्यंत भावपूर्ण होऊन केनला एक गोष्ट सांगितली. आणि ती होती प्रख्यात भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन ह्यांची !
आणि ते पत्र होते रामानुजन ह्यांच्या पत्नीचे !
१९८५ मध्ये जगभरातील ( मुख्यत्वे अमेरिका आणि UK ) गणितज्ञांनी रामानुजन ह्यांचा ब्राँझचा अर्धपुतळा तयार करण्यासाठी पुढाकार घेऊन वर्गणी गोळा केली होती त्यासाठी आभार मानणारे पत्र होते ते.
केनच्या वडिलांना, पहिल्या महायुद्धाच्या प्रतिकूल काळात रामानुजननी इंग्लंडमध्ये राहून संशोधन चालू ठेवण्यासाठी दिलेला लढा हा अमेरिकेत टिकून राहण्यासाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरला होता.
आणि त्याक्षणापासून केनला रामानुजन उलगडत गेले, समजत गेले आणि आज केन त्यांना देव मानतो !
इतकंच नव्हे तर स्वत:च्या गणितातल्या संशोधनाव्यतिरिक्त केननी मद्रास विद्यापीठात जाऊन स्वत: रामानुजनच्या वह्या अभ्यासल्या. त्यांच्या केम्ब्रिजमधल्या कामाची हस्तलिखिते, कागदपत्रे अभ्यासली आणि नुकतंच त्याच्या विद्यार्थिनीने आजपर्यंत दुर्लक्षिला गेलेला एक रामानुजन ह्यांचा सिद्धांत त्या कागदपत्रांमधून शोधून काढला !
---------------------------------------------------------------------------------
श्रीनिवास रामानुजन ऐयंगार, आधुनिक युगातले प्रख्यात भारतीय गणितज्ञ ! ( the most celebrated indian mathematician of २०th century )
आज २२ डिसेंबर ही त्यांची जयंती. हा दिवस २०१२ पासून भारतात ' राष्ट्रीय गणित दिवस' म्हणून साजरा केला जातो.
Srini ramanujan_0.jpg
---------------------------------------------------------------------------------
रामानुजन ह्यांच्या गणितकार्याविषयी मी विशेष लिहिणार नाही कारण विकिपीडियावर बर्यापैकी सोप्या भाषेत लिहिलेलं आहेच आणि चर्चेच्या अनुषंगाने येइलच.
रामानुजन ह्यांनी केलेल्या संशोधनाला पुढे नेउन अनेक नवीन वाटा गणितात निर्माण झाल्या. अनेक शास्त्रज्ञांना अत्यंत प्रतिष्ठेची ' फिल्ड्स' पदकं मिळाली. आजही रामानुजन ह्यांचं कार्य एक मैलाचा दगड मानलं जातं.
---------------------------------------------------------------------------------
Robert Kanigel ह्यांनी The Man Who Knew Infinity हे श्रीनिवास रामानुजन ह्यांच्या आयुष्यावर आधारित पुस्तक लिहिलं. आता ह्याच पुस्तकावर आधारित Matthew Brown दिग्दर्शित चित्रपट येतो आहे. ह्या चित्रपटातला गणिताचा भाग प्रा. केन ओनो आणि प्रा. मंजुळ भार्गव ह्यांनी लिहिला आहे त्याशिवाय इतरही बरीच मदत केली आहे. त्यामुळेच हे दोन सध्याचे आघाडीचे गणितज्ञ ह्या हॉलीवूडपटाचे को- प्रोडुसर झाले आहेत !
चित्रपट : The Man Who Knew Infinity
------------------------------------------------------------------------------
नुकतंच प्रा. केनचं रामानुजन ह्यांच्या आयुष्यावर, गणितसंशोधनावर ICTS मध्ये व्याख्यान झालं त्यात ह्या चित्रपटाचा ट्रेलर पाहायला मिळाला आणि म्हणूनच त्याचा सारांश, गणिताचा भाग वगळून इथे द्यायचा प्रयत्न केला आहे.

रविवार, १८ ऑक्टोबर, २०१५

ऐलमा पैलमा - . . . - Happy Birthday to you

नवरात्र आणि ऑक्टोबर महिना म्हटल्यावर मला सगळ्यात आधी आठवणारी गोष्ट म्हणजे भोंडला ! 

बरीच म्हणजे साधारण मी लहान असताना ५ - ६ वर्ष सलग आम्ही घरी भोंडला केला मग मी मोठी झाले शाळेच्या परीक्षादेखील ह्याच सुमारास यायच्या आणि मग ही एक सुंदर प्रथा आमच्या घरापुरती बंद पडली.
माझा वाढदिवस बऱ्याचदा नवरात्रीत येत असे आणि लहानपणी पाश्चात्य पध्धतीने वाढदिवस साजरे केलेले मला आवडत नसत मग भोंडल्याच्या निमित्ताने वाढदिवस साजरा व्हायचा आणि वेगळीच मज्जा यायची.
आदल्या आठवड्यात hall मध्ये सामानाची rearrangement करून भोंडल्याचा फेर धरता येईल इतकी जागा आम्ही करून ठेवायचो.

सोसायटीमधल्या सगळ्या तायांना संध्याकाळी यायचं आमंत्रण आईने दिलेलं असे. ( माझ्या वयाचं किंवा लहान तेव्हा कोणीच नव्हतं! ) सकाळीच आजी घरी यायची आणि काहीतरी माझ्या आवडीचा पदार्थ खिरापत म्हणून करून ठेवायची.

माझ्याकडे एक खेळण्यातला लाकडी हत्तीचा पुठ्ठा होता. मग त्या हत्तीला एका पाटावर ठेवून त्याभोवती एखादी ताई खडूने छोटीशी रांगोळी काढत असे. सगळे त्यांच्या आयांसकट जमले की आमचा भोंडला सुरु व्हायचा. सुरुवात अर्थातच ' ऐलमा पैलमा गणेश देवा… ' म्हणून होत असे आणि मग एक - एक गाणी म्हटली जात. आजीला बरीच गाणी पाठ होती त्यामुळे ती म्हणताना -  त्यातले विनोद , उपहास आणि मुलींच्या सासरच्या मंडळींवरच्या गंभीर टिप्पण्या समजून घेताना त्या वयात मज्जा यायची -काळ किती बदललाय हे जाणवायचे.

सगळे दमले की मग सगळ्यात महत्त्वाचा खिरापत ओळखण्याचा खेळ सुरु व्हायचा. मग अगदी चव - वास - रंग - रूप सगळे प्रश्न स्वयंपाकघरात विचारले जायचे. आई - आजी आम्हाला ओळखता येणार नाही अश्या पद्धतीची उत्तरं देत खिंड लढवायच्या. कधीतरी जी व्यक्ती ती खिरापतआणायची ती भलतेच प्रश्न विचारून / उत्तरे देऊन दिशा बदलायचा प्रयत्न करत असे. आणि सगळ्या खिरापती ओळखल्याशिवाय वाढदिवसाचा केक कोणालाच मिळत नसे त्यामुळे सगळी मजा खिरापत ओळखण्यात ! डोकं चालवायला कसली मज्जा यायची तेव्हा

पुढे एक वर्ष काहीतरी झालं म्हणून जमलं नाही आणि मग पुन्हा कधी तसं काही झालं नाही. आता बरीचशी गाणीसुद्धा विसरले आहे कधीतरी लिहून काढायला हवीत आणि online साठवायला हवीत.

वाढदिवस असेच येत गेले पुढेही येतील. उगाचच यंदाही नवरात्र सुरु असल्यामुळे ह्या जुन्या आठवणींची नोंद करून ठेवावीशी वाटली :)

अगदी लहान असताना आजी औक्षण वगरे करत असे नंतर वाढदिवस हे केवळ पेस्ट्रीज खाण्यापुरते उरले. शाळेत आम्ही coffee bite वाटायचो .  इथे IISc मध्ये आले तेव्हा आम्ही आमच्यातला पहिला वाढदिवस अगदी केक आणून  साजरा केला त्यामुळे माझे मित्र - मैत्रिणीसुद्धा माझ्या वाढदिवसाला तेच करत.तीच पद्धत पडली जणू ! पहिल्या वर्षी ठीक होतं पण नंतर लक्षात आलं formality म्हणून मित्र - मैत्रिणी येतात. ( असं आम्ही इतरांच्या वाढदिवसाला observe केलं म्हणून लक्षात आलं ! )
बऱ्याचदा माझे  खास असे दोस्त नसल्यामुळे माझा वाढदिवस गेली दोन वर्ष विसरताहेत :) . साजरा करू नका असं थेट सांगताही येत नाही अन् खोटं सतत हसता येत नाही ( म्हणून इथे नोंद करून ठेवत्ये ! )
इथून पुढे कदाचितपद्धत बदलेल किंवा साजरेपण संपेल पाहूया :)

' जे जे होईल ते ते पाहावे चित्ती असू द्यावे समाधान ।' हेच खरं !


१८ ऑक्टोबर २०१५
( सुज्ञास सांगणे न लागे ;p )

मंगळवार, १६ जून, २०१५

मैत्रीचे बंध

She was the one who I could always count on !

Himani,not just a friend !

Crazy Pravega work, Endless planning, OCD's, Perfection and implementation, Implementation coordination, Gossip walks, Lunch and dinner fun, Sunday Morning Breakfast, Night walks, Crazy schedules...
Midnight calls, panic messages, Crying spells, Random Hangout pings...
And a cherry on the the top was : 'Happy Family'

असे कितीतरी क्षण एकत्र जगलो, अनुभवले . तिच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. जेव्हा जेव्हा मला मदतीची गरज होती तेव्हा तेव्हा ती धावून येई मग अगदी अपरात्री एखादा मेल लिहून देणं  किंवा मधमाशी चावल्यावर हेल्थ सेंटर मध्ये मला घेऊन जाणं , pravegaच्या वेळी चिडले तर माझी समजूत घालणं असेल. प्रत्येक वेळी 'ती' माझ्यासोबत असे. कामाच्या वेळी आमची wavelength कायमच जुळत असे. She was my best colleague !
एखादी नवीन गोष्ट करत असेन तर ती देखील तितक्याच उत्साहाने प्रोत्साहन देत असे.
ती जितक्या सहजतेने एखादे काम माझ्याकडून करून घेई तितक्याच सहजतेने मी करत असलेल्या कामात आज्ञाधारकपणे मदत करीत असे.
शिकवण्याची तिची शैली खासच ! अगदी काहीच माहित नसलेल्यालाही ती खूप छान समजावून सांगते !
आमच्या priorities, आवडी-निवडी बर्यापैकी जुळतात त्यामुळेच आम्ही कायम एकत्र enjoy करू शकलो.
तिच्यापासून मी काहीच कधीच लपवू शकले नाही. खरंतर तसा प्रयत्नही कधी केला नाही !
अगदी तिला मी भेट दिली ती तयार करताना सुद्धा मला तिच्यापासून लपवून ठेवणं खूप अवघड गेलं.
अशी ही मैत्री अगदी निरपेक्ष आणि पारदर्शक ! अगदी हेवा वाटावा अशी :)
आता अखेर जवळ येत आहे ह्याची जाणीव दोघींनाही आहे.
मैत्री कदाचित तुटणार नाही खरंतर आम्ही ती टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करूच पण आता ते रोज सकाळी एकमेकींना ब्रेकफास्टसाठी उठवणं नसेल किंवा रात्री जेवताना दिवसभराच्या गप्पा !
जगातला कुठलाच विषय व्यर्ज्य नसलेली सकस चर्चा नसेल !
केवळ hangouts च्या profile picture द्वारे आम्ही एकमेकींना भेटू.
पुन्हा आमची भेट होईल की नाही सांगता येणार नाही पण ह्या तीन वर्षांच्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवीन हे नक्की !
तिच्याबद्दल लिहू तितकं थोडं आहे !
एक अत्युत्कृष्ट विद्यार्थिनी , अप्रतिम नृत्यांगना आणि लेखिका !
माझी खूपच लाडकी senior !
I am going to miss her a lot !
She has helped me change my perspective towards life !
She has supported me always in all difficult times !
She has lived up to all the definitions of "Friend'
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आजचा दिवस असाच एक नोंद करून ठेवण्यासारखा !
सकाळीच तिला मी तिच्यासाठी तयार केलेल्या भेटी दिल्या.
खूपच आवडल्या असं म्हणाली लगेच.
एका डोळ्यात अश्रू अन् दुसऱ्यात हसू !
घट्ट मिठी मारून रडली ती खूप
संध्याकाळी treat दिली तिने.
खूप गप्पा मारल्या आणि पोटभर जेवलो.
अनेक आठवणींची साठवण आम्हाला आयुष्यभर साथ देईल.
आजवर असं इतकं कोणाबद्दल कधीच वाटलं नव्हतं
आत्ताही लिहिताना डोळ्यात काहीतरी दाटून येतंय
ती एका उत्कृष्ट ठिकाणी पुढील शिक्षणासाठी जात आहे ह्याचा आनंद
पुन्हा भेटू किंवा नाही ह्याचं दु:ख
laptop screen धुसर होतोय अन् तिच्यासाठी एव्हडंच म्हणावस वाटतंय …
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Himani,

All the best for your future. You are an amazing person.
Thanks for being there.
Stay in touch.

Lots of love,

- Little (Troublesome) Monkey

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

- संपदा
  १५ जून २०१६ 


( तळटीप : फोटोमध्ये कात्र्या ह्या mission accomplished ready to cut down किंवा pravega चा V अश्या अर्थाने आहेत ! )

शनिवार, ६ जून, २०१५

पुस्तके : एक भेट

माझ्या शाळेत दरवर्षी बक्षिसे म्हणून पुस्तकांसाठी ठराविक रकमेची कुपने दिली जात. मग आई त्यात आणखीन भर घालून एखादे चांगले पुस्तक विकत घेई. पुढे पुढे शाळेने पुस्तकेच बक्षीस म्हणून देणं सुरु केलं. लहान असल्यापासूनच घरात खेळणी आणि कपड्यांच्या एकत्र संख्येपेक्षा जास्त पुस्तके घरात असलेली मी पाहिली आहेत. त्यामुळेच एखाद्याला भेट द्यायची तर ती पुस्तकांचीच असंच माझं कायम मत होतं नुकताच ह्या गृहितकाला मोठा धक्का बसला.

माझी एक सीनिअर पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या संस्थेत जाणार असल्याने तिला काहीतरी पुस्तक भेट द्यावे असे मनात होते. नुकताच मी एका पुस्तकाचा मराठी अनुवाद वाचला. मला प्रचंड आवडलेलं हे पुस्तक एका महिला शास्त्रज्ञाबद्दल असल्याने त्याचा इंग्रजी अनुवाद (मूळ फ्रेंच आहे ) तिला भेट म्हणून द्यावा असं माझ्या मनात होतं.

आम्ही सगळेच soft copy वर जगणारी मंडळी त्यामुळे ह्या पुस्तकाची soft copy असेल असं वाटतंच होतं आणि मला ते नको होतं. मला बऱ्याचश्या अनधिकृत वेबसाईट्सवर काही ते सापडलं नाही म्हणून मी आनंदाने ते amazon वरून kindle copy स्वरूपात भेट कसे द्यायचे ह्यावर साधारण एक तासभर शोध घेतला , तिची kindle copy चालेल ना वगैरे विचारून परवानगी घेतली आणि किंमत शुक्ती करण्याआधी पुन्हा एकदा soft copy चे अस्तित्व चेक करायला गेले आणि …….
.
.
.
.

जे मला ३ तास खर्च करून सापडले नव्हते ते अर्ध्या तासात मिळाले.

माझी शंका खरी ठरली म्हणून आनंद मानायचा की हल्ली soft कॉपीज मुळे पुस्तके भेट म्हणून देता येत नाहीत ह्याचे दु:ख व्यक्त करायचे ??

( खरंतर soft कॉपीज वापरून प्रताधिकार कायद्याचा भंग होणं आणि लेखकाला रॉयल्टी न मिळणं असे अनेक गंभीर मुद्दे असले तरी त्याबाबत पुन्हा कधीतरी . सध्यातरी पुस्तक भेट देत येणार नाही याचं दु:खच जास्त ! )

शुक्रवार, २२ मे, २०१५

काहीच्या काही . . उगाचच (३)

संपदा
sam (हे उच्चारायच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या तऱ्हा आहेत )
samee
sampu
saampoo
संप्या
छोटा टारझन
अध्यक्ष बाई
Little monkey
Spy
NSA
Maxx Genius (patented by Krishnan and can be used only by Himani & Krishnan*  ) 

Kid from Happy Family 

Kolha (आईगं ! चुकून एका पत्रावर आडनाव अर्धवट छापलं गेलं होतं तर kolha म्हणे ! )

चंद्रशेखर ('आडनाव नाव वडिलांचे नाव' ह्या पद्धतीमुळे काहीही  भन्नाट combinations करतात ! ) 

अजून काय काय नावे असणारेत ह्यापुढे माझी …

Note : *हे माझे IISc मधली सिनिअर आहेत 

मंगळवार, ५ मे, २०१५

आता निरोप हा घ्यावा …

वाटलं नव्हतं कधी
इतक्या लवकर हा दिवस उजाडेल
कटू सत्याला सामोरे जात
भावनांना बांध घालावा लागेल

आत्ताच झाली होती भेट जणू
counselling नुकतेच संपलेले
१ ऑगस्टच्या त्या दिवशी
orientation मध्ये भेटलेले

महिन्याभरातच सुरु झाली
फेस्ट प्रवेगाची तयारी
नव्या ओळखी नवे विषय
यशस्वी करण्या एक विज्ञान वारी

बघता बघता दिवस लोटले
तयार झाली core कमिटी
सिनिअर जुनिअर झालो सारे एक
भिंत केव्हाच पडली होती

कामांचे डोंगर उपसताना
मैत्रीची मुळे खोलवर रुजत गेली
तयार झाले एक कुटुंब
नाव त्याचे एकच : IISc UG

त्यांना नव्हते कधीच कुणी
पुढे  दाखवायला मार्ग
पण स्वतः खोदलेल्या रस्त्यावर
आमच्यासाठी ते झाले दीपस्तंभ
UG Batch 2015 and 2016
This is what we share !
This is how we were !
Will miss you lots
my Dear seniors !

कुठचीही अडचण येवो
केवळ एक फोन करावा
किंवा एका हाकेवर
जवळचा senior धावून यावा

कित्ती मज्जा कित्ती मस्ती
treats आणि ट्रिप्स
quarks , pravega scipher
सदैव तत्पर UG team

 सुख दु:खे विनोद चिडचिड
यश - अपयश अन् gosips
काय केलं नाही आम्ही एकत्र ?
खरंचअसे काही आठवतही नाही

अखेर उजाडला  तो
एप्रिल ३० चा दिवस
खूप पुढे निघून गेले
आमचे सगळे seniors

कोणी इथे तर कोणी तिथे
प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या
होईल का कधी पुन्हा
अशी एकत्र भेट ?

कटू सत्य असे हे
आता स्वीकारायला हवे खरे
पण झुलत आठवांच्या हिंदोळ्यावर
नयनांतून अश्रू ओघळे

दाटून येई कंठ
काही सुचेना आता
परि पुन:श्च भेटण्याच्या आशेवर
आता निरोप हा घ्यावा
आता निरोप हा घ्यावा
आता निरोप हा घ्यावा … 





- Sampada
( Your Little Monkey / Sammy / Sampo / Sam )


सोमवार, २० एप्रिल, २०१५

विद्यार्थी'दशा'

आदर्शवादी आणि एखाद्या चांगल्या विद्यार्थ्यासारखं वागण्याचे संस्कारांची मुले आपल्यात किती घट्ट रुजलेली असतात नाही !
कधीतरी एखादी assignment उशिरा दिलेली चालते,
एखाद- दुसरं lecture बुडवलेलं चालतं
कधीतरी आळशी TA च्या assignments  मध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर ने देताही पूर्ण मार्क मिळू शकणार असतील तर वेळेअभावी ते चालू शकतं .
थोडासा ढिसाळपणा चालतो
दुसऱ्याच्या assignments ची उत्तरे copy केलेली चालू शकतात


नाही झेपत कधी कधी
खूप त्रास होतो स्वत:ला समजावताना

बहुदा विद्यार्थी'दशा' असेल तर हे अनुभवावं एकदातरी :P

सोमवार, १३ एप्रिल, २०१५

काहीच्या काही . . उगाचच (२)

एक जाहिरात : 

कामाचे स्वरूप : प्रश्न क्रमांक द्या उत्तरे छापून मिळतील .
किमान कालावधी : ३ दिवस
कमाल कालावधी : ७ दिवस
एका वेळी ५ जॉब स्वीकारले जातील .
specialists in : LaTeX मध्ये उत्तरे typset करून मिळतील
                          सुबक / सुंदर अक्षरात हस्तलिखित हवे असेल तर तेही मिळेल
यंत्र  : ऑफसेट(?)  प्रिंटींग ( ४ color machine ) ( Red Green Black Blue Add Gel ink )
पत्ता : इथेच संपर्क साधा …

किंमत : ३ क्रेडीट Course मधले १० - २० मार्क

आपली विनम्र ,
कामाच्या प्रतीक्षेत (बाबांची मुलगी )

छापखाना झालाय माझा !

(G+ वरची पोस्ट वाहून जाऊ नये म्हणून इथे चिकटवली )

गुरुवार, १९ मार्च, २०१५

काहीच्या काही . . उगाचच (१)

 एक होता बैल . वर्षातले आठ महिने घाण्याला जुंपलेला …
त्याचे काम एकच …
झोपेच्या खोबऱ्यातून assignments ची उत्तरे काढणे …


शनिवार, २४ जानेवारी, २०१५

Humanities UH 302 : शासनाची ओळख

नव्या वर्षासोबतच नवे सेमिस्टर सुरु झाले. नवे कोर्सेस , वेगळे विषय , नवे वेळापत्रक ह्या सगळ्याशी जुळवून घेतानाच  जवळ जवळ ९- १० महिने ज्याची अत्यंत आतुरतेने वाट बघितली होती तो म्हणजेच आमचा शेवटचा humanities चा कोर्स सुरु झाला . अगदी course format वाचला तेव्हाच खात्री पटली होती आणि पहिल्या लेक्चर मध्ये बऱ्याच अपेक्षांची पूर्ती होईल असे संकेत मिळाले . अगदी वेगळा अनुभव , अनेकविध विषय अन् तेही आपल्या रोजच्या वाचनातले ! त्यामुळेच वेगवेगळ्या लेक्चर्स मध्ये मिळालेली माहिती , त्यात आम्ही केलेली चर्चा  , त्याच विषयाशी संबंधीत अश्या एका वेगळ्या विषयावर विद्यार्थ्यांच्या गटाने केलेल्या वाचन , संशोधनाचे सादरीकरण ह्याचा गोषवारा इथे मांडवा असं मला वाटतंय . जशी lectures होतील तसं त्याच लिहिण्याचा प्रयत्न करेन . बघूया कितपत जमतंय . खरतर इंग्रजीत झालेल्या चर्चा मराठीत आणि  माझ्या भाषेत मांडणं हेच बहुतेक सगळ्यात कठीण असेल . English मध्ये लिहिणं खरंच खूप सोपं गेलं  असतं पण अश्या प्रकारचे विषय एकत्रित मराठीत कुठे मांडले गेलेले माझ्या सहज वाचनात आले नाहीत म्हणूनच ही उठाठेव !

===================================================
मानवशास्त्र म्हणजेच Humanities चा कोर्स आम्हाला प्रत्येक सत्रात असतो त्यातला शेवटचा केवळ एका क्रेडिटचा सेमिनार कोर्स म्हणजेच UH 302 : Introduction to governance म्हणजेच ' शासनाची ओळख ' !
अगदी नावाप्रमाणेच ह्या कोर्सच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या शासनयंत्रणांची ओळख - माहिती आणि त्यासोबत त्या यंत्रणेशी संबधित एखाद्या संवेदनशील / महत्वपूर्ण विषयावर विद्यार्थी गटाने केलेले प्रेझेंटेशन असे एका सत्राचे स्वरूप असेल . आत्तापर्यंत २ सत्र झाली आणि मुख्य म्हणजे जेवणाची वेळ उलटून गेली तरी -  रात्रीचे साडे आठ वाजून गेले तरी आणि मुख्य म्हणजे जवळपास तीन तास चर्चा - परिसंवाद होऊनही ५० % उपस्थिती शेवटपर्यंत होती  हे नक्कीच आश्चर्यकारक ( प्राध्यापकांसाठी :P ) होतं . 




प्रध्यापाकांबद्दल थोडेसे :
Prof . Uday Balakrishnan हे १९७५ च्या batch चे भारतीय टपाल सेवेतील एक निवृत्त अधिकारी ! राज्यशास्त्रात उच्चशिक्षण घेतलेल्या उदय यांनी भारत सरकारच्या अनेकविध महत्वपूर्ण प्रकल्पांवर काम केले आहे आणि त्या अनुषंगाने देशाचा बराचसा ग्रामीण भागही पिंजून काढला आहे . ह्या सेवेच्याच कालावधीत शासनातर्फे त्यांची नेमणूक IISc मध्ये ५ - ७ वर्षे registrar म्हणून झाली होती . सध्या  ते एक लेखक , CCS -  IISc मध्ये मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत असून कोचीन येथील एका कला संग्रहालयाचे सल्लागार देखील आहेत .


===================================================


Lecture ०१ : १० जानेवारी २०१५

खरंतर त्या दिवशी मुख्यत्वे आमचे गट पाडणं , विषय निवडणं आणि लेक्चरच्या वेळा ठरवणं ह्यातच बराचसा वेळ गेला परंतु नेमकं काय काय शिकायला मिळेल ह्याची थोडीफार चर्चाही झाली.

भारत  : एक लोकशाही संघराज्य 
वय : जेमतेम ७० वर्षे
लोकसंख्या केवळ अफाट !
अनेक तापदायक शेजारी !
मुक्त अर्थव्यवस्था : १९९१ पासून प्रयत्न


कृषिप्रधान अर्थव्यवस्था
आणि  ……
आपण अजून स्वतंत्र  आहोत  - लोकशाही कशी असावी एक उत्तम उदाहरण . आज आपल्याला ( अजूनतरी ) कोणीतरी लष्करी अधिकारी अचानक उठाव करून देश ताब्यात घेईल ह्याची तितकीशी भीती नाही खरंतर  असा विचार आपण कधीच करत नाही !
 कितीही संकटे आली तरीही एक देश म्हणून आपण एकत्र येतो . खरंतर वाकेन पण मोडू देणार नाही अश्या लवचिक मानसिकतेतून आजवर आलेल्या अनेक अंतर्गत राजकीय - सामाजिक - नैसर्गिक उठावांना आपण यशस्वीपणे तोंड दिले.
इंग्रजांनी जिथे सोडले तिथूनच आपण प्रगतीला सुरुवात केली ! आज आपण त्या प्रगतीच्या - उत्कर्ष साधण्याच्या मार्गावर असलेल्या एका वळणावर उभे आहोत . कदाचित पुढच्या विकासासाठी आपल्याला आजची परिस्थिती बदलायची नितांत गरज असेलही पण हा केवळ एक टप्पा आहे आणि १९४७ च्या मानाने आणि तत्कालीन आर्थिक परिस्थिती , लगोलग झालेली युद्धे  , आणीबाणी ह्या सर्वांना तोंड देऊन आपण एक देश म्हणून जी प्रगती साधली आहे ती नक्कीच कौतुकास्पद आहे !

आगदी जुने* संदर्भ चाळले तर अनेक अमेरिकन आणि युरोपीय राजकीय अभ्यासकांनी दक्षिण आशियाला वाचवायचा असेल तेथील परिस्थिती सुधारावयाची असेल तर भारताचा बळी  लागेल अशी अभ्यासपूर्ण विधाने केली होती त्यापार्श्वभूमीवर आपण एक लोकशाही सार्वभौम संघराज्य म्हणून ( अलिप्ततावाद सांभाळून ) जे काही साधले आहे ते तितकेही वाईट नाहीच म्हणून ह्यापुढे वेगवेगळे विषय चर्चेस घेऊन त्यासंदर्भात आजवर काय झाले आणि कोणत्या सुधारणा करता येतील / पुढची विकासाची दिशा काय आहे हे समजून घेऊया .





*१९५० पूर्वी आणि त्यासुमारास काहीवेळा १९६५ नंतरही