रविवार, २० एप्रिल, २०१४

माझा (?) मतदारसंघ !

मी बंगलोरमध्ये असताना १८ वर्षांची झाले अन इथे लगेचच विधानसभेची निवडणूक होती त्यामुळे सध्याचा माझा मतदारसंघ आहे "मल्लेश्वरम - बेंगळूरू उत्तर " पण तरीही माझा खरा मतदारसंघ -  जुना दक्षिण मध्य मुंबई म्हणजेच २००९ च्या फेररचनेनंतरचा नवीन दक्षिण मुंबई शहर हा मतदारसंघ !

येत्या २४ तारखेला येथे  मतदान होणार आहे . हा मतदारसंघ (जेंव्हा दक्षिण मध्य मुंबई होता तेव्हा ) गिरणगावाचा समावेश असल्यामुळे आणि मनसे तेव्हा स्थापन झालेली नसल्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असे . मोहन रावले ह्यांचा हा परंपरागत मतदारसंघ होता परंतु २००९ साली झालेली पुनर्रचना आणि मनसेने बाळा नांदगावकर ह्यांना दिलेली उमेदवारी ह्यांमुळे मतविभागणी होऊन मिलिंद देवरा ह्यांचा विजय सुकर झाला . मिलिंद देवरा ह्यांच्यासाठी ही  निवडणूक चुरशीची होती परंतु मतविभागणीमुळे विजय अक्षरश: सोपा झाला होता . इतर मतदारसंघांप्रमाणेच इथेही मनसे + शिवसेना > कॉंग्रेस हेच चित्र होतं . यंदाच्य आप पक्षाच्य उमेदवार मीरा सन्याल ह्या स्वतंत्र उमेदवार म्हणून उभ्या होत्या अन त्यानाही १० हजाराच्या आसपास मते मिळाली होती .

यंदाची परिस्थिती पाहता अन मीरा सन्याल ह्यांना गेल्या वेळी मिळालेली मते पाहता निवडणूक तिरंगी न होता चौरंगी होईल असा अंदाज आहे . मनसे - शिवसेना हि विभागणी अपरिहार्य आहे . त्यातच मोहन रावले ह्यांनी निवडणुकीच्या ऐन तोंडावर chameleon प्रमाणे शिवसेना - राष्ट्रवादी - शिवसेना असे पक्षाबद्दल केवळ काही आठवड्यांच्या कालावधीत केल्याने त्य्नाच्या समर्थकांमध्ये गोंधळ उडालेला असणे स्वाभाविकच आहे .
अरविंद सावंत - बाळा नांदगावकर  ।।  मिलिंद देवरा - मीरा सन्याल
अशी मतविभागणी होण्याची शक्यता खूपच जास्त आहे .
ह्या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो . ह्याकडे जरा अधिक पाहूया

१ . वरळी : 
विद्यमान आमदार : सचिन अहिर
पक्ष : राष्ट्रवादी कॉंग्रेस
ह्या मतदारसंघावर  ( अर्थातच हा माझा विधानसभा मतदारसंघ आहे ! ) दत्ताजी नलावडे ह्यांची अनेक वर्षे पकड होती . वरळी कोळीवाडा हा शिवसेनेला  कायम मदतीचा हात देणारा विभाग ह्याशिवाय वरळी नाका अन् त्यापलीकडील पूर्वेकडच्या भागातही सेना - मनसेचे प्राबल्य . परंतु नलावडे ह्यांनी घेतलेली निवृत्ती , अहिरांची प्रचंड आर्थिक क्षमता , राजकीय दादागिरी अन पवारांशी जवळीक ह्यामुळे येथे प्रचंड धुमश्चक्री प्रचारादरम्यान पाहायला मिळाली होती . ह्याशिवाय सेना - मनसे मतफ़ुटी होतीच !  येथील मते ह्या  पक्षांत विभागली जातील असा माझा अंदाज आहे . येथील
नगरसेवकांचा जनसंपर्क अफाट आहे अन् त्यामुळेच येथे त्यांचा प्रभाव अन प्रचाराची तीव्रता निर्णायक ठरेल .

२. शिवडी :
विद्यमान आमदार :बाळा नांदगावकर
पक्ष : मनसे
गेल्या वेळी येथे तेव्हाचे आमदार दगडू सकपाळ  ह्यांना  बाळा नांदगावकर ह्यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत पराभूत केले होते . ह्यात प्रामुख्याने गिरणगावात सेना - राज ह्यांच्या झालेली मतविभागणी आणि दोन्ही उमेदवारांचा जनसंपर्क ह्या कारणांचा समावेश होता . यंदा ह्या मतविभागणीला अन् राज ह्यांच्या दिशाहीन प्रचाराला कंटाळल्याने अन मोदींच्या प्रभावामुळे महायुतीकडे मतदार  शकतो परंतु खुद्द नांदगावकरांना मिळालेले तिकीट ह्यामुळे समीकरणे पार बदलू शकतात ,


३. भायखळा 
विद्यमान आमदार :मधुकर चव्हाण
पक्ष :  कॉंग्रेस
ह्या भागात बहुदा भेंडीबाजार , भायखळा आणि इतर पूर्वकडील भागांचा समावेश होत असावा ( मला माहिती मिळाली नाही भौगोलिक दृष्ट्या माझा अंदाज बरोबर असावा ) त्यामुळेच सारी अमराठी मते देवरांना मिळण्याची शक्यता खूपच जास्त आहे .


४. मलबार हिल 
विद्यमान आमदार :मंगलप्रभात लोढा
पक्ष :भाजप
तब्बल वीस वर्षे येथे विद्यमान आमदार निवडून येत आहेत. बाबुलनाथ परिसर तसेच इतर गुजराती बहुल वस्ती , जयवंतीबेन मेहता ह्यांनी तसेच लोढांनी केलेली कामे जनसंपर्क ह्यामुळे हा भाग भाजपची हमखास विजय मिळवून देणारी जाग. त्यातच मोदिलातेमुळे सगळा गुजराती मतदार महायुतीला मत देणार हे जवळपास निश्चित ! ह्याशिवायाही येथे  आहे त्यामुळेच मनसेमुळे मतविभागणी झाली नाही तर अरविंद सावंत ह्यांना येथून चांगलीच आघाडी मिळू शकते .

५. मुंबादेवी 
विद्यमान आमदार :अमीन पटेल
पक्ष :  कॉंग्रेस
येथे देखील मलबार हिल्प्रमाणे  मतदार आणि मूळचे स्थानिक मुंबईकर ( पाठारे - प्रभू ) ( ह्यांची इथे बरीच property आहे असे ऐकिवात आहे ! ) राज पुरोहित ह्यांचा जनसंपर्क ह्यामुळे भाजपचे प्राबल्य आहे परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी मनसे - शिवसेना मतविभागणीचा महायुतीला चांगलाच फटका बसला होत. यंदा ही मते पुन:च महायुतीकडे एकवटली जाऊ शकतात ( सारे काही मोदी effect वर अवलंबून )


६. कुलाबा 
विद्यमान आमदार :शेखर Annie
पक्ष : कॉंग्रेस 
ह्या मतदारसंघात कुलाबा कोळीवाडा अन नेव्हीनगर हे भाग सोडले तर बहुतांश विभाग हा गर्भश्रीमंतांच्या रहिवासाचा आहे . अन हा भाग पूर्वीपासूनच मुरली देवरांच्या परंपरागत मतदारसंघात येत असल्याने कॉंग्रेसची हक्काची मते येथे आहेत .


ह्यासगळ्यात आता 'आप' चा विचार करूया ! मीरा सन्याल ह्यांचे नाय ह्याआधीही मतदारांनी मतदानयंत्रावर पाहिले आहे . आपचा प्रभाव तसा उच्च मध्यमवर्गीय अन् श्रीमंत मतदारांवरच राहील असा अंदाज आहे ह्याचे मुख्य कारण म्हणजेच गिरणगावातील सारी मंडळी बाळासाहेबांना दैवत मानणारी आहेत . जरीही मनसेला मते दिली तरीही त्यांची सेना ( मग ती शिवसेना असो व म. नवनिर्माण !) निष्ठा ढळत नाही !
सन्याल ह्या कॉंग्रेसची मते खेचू शकतात . त्याबाबतीत देवरांना गाफील राहून चालणार नाही . वरळी सी फेस , परळ मधील उच्चभ्रू वस्ती ( ज्याला status symbol वाटावा म्हणून अप्पर वरळी म्हटले जाते जे खरे वरळी नव्हेच ! ) मलबार हिल खंबाला हिल येथील अगुजराथि मतदार , कुलाबा अन मरीन drive परिसर येथे ही आप -  कॉंग्रेस मतविभागणी देवरांना तापदायक ठरू शकते . इतर मराठी बहुल सेनानिष्ठ भागात आप केवळ तरुण मतेच मिळवू शकेल असे सकृतदर्शनी वाटत आहे .

त्यामुळेच येथे चुरशीची चौरंगी लढत पाहायला मिळणार हे निश्चित !
विजय कोणाचा होईल हे सांगणे कठीण असले तर जर आपचा ताप झाला नाही तर देवरांना कोणी हरवू शकेल असे वाटत नाही परंतु कोणत्या विभागात किती टक्के मतदान होईल अन ते कोणत्या वयोगटाचे अन धर्माचे ह्यावर सारी समीकरणे अवलंबून असतील !

पाहूया काय होते आहे ते !

I voted. Will you ?
"Use your right...Cast your vote to bring change" 
Let us build our nation.


- sam

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा