सोमवार, ७ एप्रिल, २०१४

रणसंग्राम

आज ७ एप्रिल २०१४.जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीच्या आयुष्यातील एक महत्वाचा दिवस ! ह्याच दिवशी  म्हणजे आजच १६व्या लोकसभेसाठीच्या मतदानाची देशाच्या एक कोपऱ्यात असलेल्या मतदारसंघापासून सुरुवात झालीये . अनेक अर्थांनी ही निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण  आहे ! त्याचा  थोडक्यात आढावा.

नवीन पिढी : तरुण मतदार

ह्या वर्षी माझ्या पिढीतले म्हणजेच  शतकाच्या शेवटच्या दशकात ज्यांचा जन्म झाला असे सगळे आम्ही लोकसभेसाठी प्रथमच करणार आहोत .
२०१३ साली जर वय १८ वर्षे असेल तर जन्म २०१४ - १८ = १९९५  त्याधीचा हवा .  निवडणूक गेली काही वर्षे दर पाच वर्षांनी होत असल्यामुळे १९९० - ९५ मध्ये जन्मलेल्या सगळ्याच नवमातदारांची पहिली मोठी निवडणूक !

आम्ही इंदिरा - राजीव हा कालखंड केवळ इतिहास - नागरिकशास्त्रात / वृत्तपत्रात वाचलाय . जेव्हा आम्हाला समजू लागलं होतं तेव्हा अटलजींच्या सरकारचे शेवटचे काही महिने राहिले होते . अन मग त्यांनतर UPA ची राजवट !
 सुरुवातीची काही वर्षे सुरळीत गेल्यानंतर अमेरिका - भारत संबंधांमुळे रशियासोबतचे आपले जुने नाते ताणले गेले होते तो एक विचित्र कालावधी होता . त्याच वेळी १२३ मुळे  सरकार अस्थिर झाले होते . अनेक छोट्या पक्षांचा बाहेरून आणि ( बाहेरून नाही म्हणजेच आतून असा माझा समज अन त्याला आर्थिक जोड असावी असा माझा दात संशय ! ) आतून दिलेला पाठींबा . चिदम्बरम ह्यांच्या १९९० सालाप्रमाणे राबवलेल्या आर्थिक सुधारणा ह्यामुळे जरी जनता ह्या सरकारच्या विर्रोधात असली तरीही पुन्हा २००९ साली ( कदाचित शीर सरकार असावे ह्यामुळे असेल अथवा घराणेशाही अन 'गांधी' हे नाव ह्यामुळे असेल ) UPA ला बहुमत मिळून सरकार स्थापन झाले .

 परंतु गेल्या ५ वर्षात जे काही झाले आहे त्याबाबत हि नवीन पिढी twitter, facebook ह्या सगळ्या माध्यमांद्वारे आपली मते परखडपणे मांडताना दिसलीह्या पिढीला अनेकांनी ऐकवला कि तुम्ही मोठ्या संख्येने मतदान केले पाहिजे त्यामुळेच यंदा हा वर्ग मत देईल अन कडची जुन्या गृहितकांना धक्का पोहोचेल अशी काही जाणकारांची अटकळ आहे!
ह्या पिढीचेही प्रामुख्याने दोन गट  पडतात

अ. शहरी तरुण : ( here its assumed that this literacy and basic education are subsets of this category ! )
हाच तो गट जो सार्वजनिक संपर्क माध्यमात मोठ्या संख्येने टीका टिप्पण्या करतो . काहीसा संभ्रमित असा हा मतदार. नक्की कोणाला पाठींबा द्यावा ह्याचा निर्णय नेमका कसा घ्यावा ह्याचा उलगडा ह्यांना अजून झालेला नाही . स्थिर सरकारची गरज कळते आहे पण राजकारणी आश्वासने कधीच पूर्ण करत नाहीत अन् सगळे एकाच माळेचे मणी मग करावे काय हा यक्षप्रश्न आहे !

ब . ग्रामीण तरुण :  शेतीत भविष्य नाही अन् शिक्षणासाठी पैसा नाही ह्या कात्रीत सापडलेला हा गट ( ह्यांच्या मानसिकतेची मला विशेष माहिती नाहीये ! )
   
नवीन पक्ष : आप

राजकारण्यांच्या खोटारड्या वृत्तीला , भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या अन म्हणूनच सरकार विरोधात असलेल्या असंतोषाला अण्णा हजारेंच्या आंदोलनाने मोकळी वात करून दिली . अनेक जन भारावून गेले अंड त्यांनी त्या चळवळीला पाठींबा दिला . त्यातले काही मनापासून चळवळीत सामील होते अन त्यांना ह्या लढ्याची कल्पना होती त्यांचा ह्या  होत तर काही केवळ एक  अन वेगळं काही (  thirll ) म्हणून सामील झाले होते . ह्यातूनच अरविंद केजरीवाल ह्यांच्या डोक्यात एक सुपीक कल्पना उदयाला आली अन आम  पार्टी ह्या पक्षाची स्थापना झाली . केवळ anti - incumbency, नव्याची नवलाई   अन् अण्णांच्या आंदोलनातून निर्माण झालेली  जागरुकता ह्यामुळेच ह्या पक्षाला दिल्लीत अभूतपूर्व यश मिळाले .
यशाची हवा डोक्यात गेल्याने असेल वा अतिअत्मविश्वास , ह्या पक्षाने हि निवडणूक लढवायचे  ठरवले .प्रसारमाध्यमांनी सुरुवातील डोक्यावर घेतल्याने आम्ही म्हणू ती पूर्व दिशा असं काहीसं अरविंद केजारीवालांना वाटू लागलं अन प्रचारसभांमध्ये त्यांचं ताळतंत्र सुटलं .
अनेकांच्या मनातून हा पक्ष सध्या उतरलेला आहे .
केवळ प्रसिद्धीचा हव्यास असलेला एक गात अशी काहीशी प्रतिमा निवडणूक सुरु होतानाचा ह्यांच्याबद्दल  निर्माण होत आहे . अन हे ह्या पक्षासाठी नक्कीच घातक असेल .

व्यक्तिकेंद्री भाजप

ह्या पक्षाबद्दल नेमकं काही सांगता येईल असा नाही पण पूर्वीच्या निवडणुकांमध्ये 'लोकशाही पद्धत ' असलेला पक्ष अशी जी ओळख होती ती आता धुसर होऊ लागली आहे . ' केवळ आणि केवळ मोदी ' असेच काहीसे वेगळेच चित्र यंदा आहे . अरुण जेटली प्रथमच निवडणूक लढवत आहेत . ह्या पक्षाच्या एखाद्या नेतुअने ह्याआधी कधी दोन जागा लाधावाल्याचे माझ्या ऐकिवात नाहीये परंतु विरोधी बाकांवर बसून कंटाळलेले नेते , मोदी लाटेचा फायदा न उठवतील तरच आश्चर्य ! बाकी  ह्यांच्याबद्दल लिहावे तेवढे थोडेच !

राहुल बाळ अन कॉंग्रेस

ह्यांना गेल्या पाच वर्षातला सावळा गोंधळ विसरायला नक्कीच आवडेल म्हणूनच घराणेशाहीवर अन पूर्व पुण्याईवर प्रचार चालू आहे असेच वाटते . राहुल ह्यांची  घेतल्यावर असलेली हि पहिलीच मोठी निवडणूक . नुकत्याच झालेल्या विधानसभेत भाजपने चारलेली धूळ , आप चा उदय अन् दिशाहीनता ह्यामुळेच सगळ्याच पातळ्यांवर वैचारिक गोंधळ उडालेला हा पक्ष नीती यशस्वी होतो ह्यावर कदाचित ह्यांचे भविष्य अवलंबून असेल !

इतर काही बाही

लोकसभा निवडणुकीत लहान पक्षांचे काम मोठ्या पक्षांना हानी पोहोचवण्याचे असते . त्यात के किती यशस्वी होतात हे कळेलच .
सीमाभागात तसेच नक्षलग्रस्त भागांत हि निवडणूक सुरळीत पार पडणे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच मतदानाचा टक्काही यंदा वाढायला हवा आहे . निवडणूक आयोग प्रचंड मेहेनत घेऊन हे काम चोखपणे पार पाडत असतो त्यामुळेच आचारसंहितेचा भंग होणार नाही ह्याची आपण साऱ्यांनीच काळजी घ्यायला हवी .


मतदानाचा हक्क बजावून आपण ह्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी खारीचा वाटा उचलुया .

- sam

PS: अजून  बऱ्याच गोष्टी आहेत पण ते लिहिण्यासाठी वेळ नाहीये त्यामुळे पुन्हा कधीतरी :) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा